मेळघाट हा महाराष्ट्रातील बालमृत्यू आणि कुपोषणासाठी कुप्रसिद्ध भाग.
या प्रश्नावर काहीतरी केलं पाहिजे या भावनेतून पुण्यातील काही मंडळींनी एकत्र येऊन मैत्री नावाची संस्था स्थापन केली.
पावसाळ्यात बालमृत्यूचे प्रमाण सर्वात जास्त असते. तेव्हा या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करून संस्थेचे स्वयंसेवक पावसाळ्याच्या महिन्यांमध्ये १०-१० दिवसांसाठी रिले पद्धतीने तिथे जात राहतात. वाड्या वस्तीवर जाऊन ते बालकांची स्थिती पाहतात. ज्या मुलांना विशेष लक्ष देण्याची गरज वाटते त्यांना पोषक आहार आणि औषधे दिला जातो व या ४ महिन्यात त्यांच्या स्थितीचा पाठपुरावा केलं जातो. १० दिवसांसाठी जाणाऱ्या पथकात वैद्यकीय ज्ञान नसणारे लोक बरेच असतात. जाण्यापूर्वी त्यांना प्रशिक्षणहि दिले जाते.
संस्थेने इतरही काही उपक्रम या भागात सुरु केले आहेत. जे त्यांच्या वेबसाईट वर पहायला मिळतील. (http://maitripune.net)
दर मंगळवारी साडेसहा वाजता हे लोक कमला नेहरू पार्क मध्ये भेटतात. तेव्हा अगदी पहिल्यापासूनचे स्वयंसेवक तिथे भेटू शकतात. हि मंडळी आपापल्या क्षेत्रातली प्रथितयश असूनही कामाच्या व्यापातून वेळ काढून ज्या उत्साहाने संस्था हि चालवतात ते पाहण्यासारखे.
संस्थेचे प्रशासकीय खर्च अत्यंत मर्यादित असल्यामुळे दिलेल्या देणगीतील जास्तीत जास्त वाटा गरजूंपर्यंत पोहोचतो हि आणखी एक चांगली बाब.
संस्थेचे ऑफिस मयूर कॉलोनी, कर्वे नगर मध्ये आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment